दिनांक: 25 जून 2022 नाशिक आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-46 आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 20 नाशिक मनपा- 08नाशिक ग्रामीण- 11मालेगाव मनपा- 00जिल्हा बाह्य- 01 नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8899 आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण :-214
दिनांक: 25 जून 2022 नाशिक आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-46 आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 20 नाशिक मनपा- 08नाशिक ग्रामीण- 11मालेगाव मनपा- 00जिल्हा बाह्य- 01 नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8899 आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण :-214
गरुड हा सर्व पक्षांचा राजा आहे कारण त्याने स्वतः मध्ये जाणीवपूर्वक बदल घडवत विशेष गुण धारण केलेले असतात .माणसा ने सुद्धा प्रयत्नपूर्वक विविध गुण जसे आत्मविश्वास ,इच्छाशक्ती , प्रामाणिकपणा ,निर्णय क्षमता, नियोजन क्षमता धारण केले तर यश प्राप्ती निश्चित असे […]
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिनांक २८ जून रोजी महाविद्यालयाच्या पाटणकर सभागृहात संपन्न होणार आहे. संस्थेच्या एच. आर डायरेक्टर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ . दीप्ती देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. नाशिकच्या पोलिस […]
भारत उभरती महासत्ता आहे ,तिचे महत्व कमी करून, तिला जागतिक व्यासपीठावरून डावलून ,जगाचे घोडे पुढे चालू शकणार नाही याची अखेर उपरती झाल्याने जर्मनीकडून त्यांच्या देशात होणाऱ्या जी ७ या परिषदेच्या अधिवेशनासाठी अखेर भारताला बोलवणे आले . २६ आणि २८ जून २०२२ या दरम्यान जर्मनीतील बवेरियन आल्प्स च्या श्लॉस एल्मौ येथे हे अधिवेशन होईल हे जी ७ परिषदेच्या अधिवेशनाचे ४८ वे अधिवेशन असेल रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरच्या काळात होणारे हे पहिलेच जी ७ चे अधिवेशन असेल . भारताने संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर पश्चिम युरोपीय देशांना पूर्णपणे अनुकूल होईल अशी भूमिका ना घेतल्याने या वेळेस भारताला जी ७ परिषेदेच्या अधिवेशनात सहयोगी सदस्य म्हणून बोलवायचे का ? यावरून ७ देशांमध्ये मतभेत झाले होते. मुख्य आयोजक असलेला जर्मनीचे मत भारताला न बोलवायचे असे होते त्यावरून तीन महिन्यापूर्वी बराच वादंग झाला होता .अखेर अंत भला तो सब भला या हिंदी वावयप्रचारानुसार जी ७ च्या ४८ व्य अधिवेशनासाठी भारताला आमंत्रण देण्याचे ठरले २६ ते २७ जून दरम्यान जर्मनीत होणाऱ्या अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व करतील. या अधिवेशनासाठी भारताबरोबर इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल या देशांना देखील आमंत्रण देण्यात आले आहेसन २०१७ पासून होणाऱ्या अधिवेशनाचा विचार करता भारताला सहयोगी आमंत्रित सदस्य म्हणून बोलवायचे हे सलग चौथे वर्ष आहे जगातील प्रमुख ७ मोठ्या ताकदवान अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना म्हणजे जी ७ होय .संघटना स्थापनेच्या वेळी तिच्यात ७ देश होते कालांतराने अमेरिकेच्या प्रभावाखालील या संघटनेत रशियाचा देखील समावेश करण्यात आला आणि जी ७ चे रूपांतरण जी ८ मध्ये झाले मात्र रशियाने २०१४ ला यूक्रेनवर आक्रमण करून त्यांच्यायुक्रेनच्या दक्षिण पूर्वेला देशाच्या मुख भूमीपासून काहीसा दूर एका बेटाच्या स्वरूपात असलेल्या क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर रशियाला या संघटनेतून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला ज्यामुळे जी ८ चे रूपांतरण पुन्हा जी ७ मध्ये झाले आजमितीस संयुक्त संस्थाने अमेरिका , कॅनडा या अमेरिका खंडातील देशांसह आशिया खंडातील जपान तसेच युरोप खंडातील युनाटेड किंग्डम , जर्मनी , फ्रांस आणि इटली या देशांसह युरोपीय युनियन या संघटनेचे सदस्य आहेत सदस्य असलेल्यांपैकी युरोपीय युनियन हा कोणताही एक देश नाहीये तर युरोपातील देशानी आर्थिक हितसंबंध आणि अन्य प्रकारचे हितसंबंध निर्माण करण्यासाठी केलेली संघटना आहे मी जरी अन्य प्रकारचे हितसंबंध असा उल्लेख केलेला असला तरी या संघटांचेच आत्मा आर्थिक हितसंबंध हाच आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे आजमितीस युरोपीय युनियनचे २७ पूर्णवेळ सदस्य आहेत आणि युक्रेन, उत्तर मॅसेडोनिया तसेच मोल्दोव्हा या प्रमुख देशांसह एकूण ७ देश सदस्यत्वासाठी पूर्ण कारवायांच्या कार्यवाहीत विविध टप्यावर आहेत जी ७ देशातील औद्योगिक उत्पादनासाठी भारताची बाजरपेठ अत्यंत महत्त्वाची आहे भारतातील लोकांची वाढलेली क्रयशक्ती या देशांसाठी बाजारपेठ तयार करते त्यामुळे भारत या देशांसाठी अत्यंत महत्वाचा देश आहे या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या वर्षी, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि यूएस अध्यक्ष जो बिडेन उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात जागतिक सुरक्षा हवामान बदल , सह आर्थिक स्थैर्य यावावर विचार मंथन होण्याची शक्यता आहे काही दिवसापूर्वीच अमेरिकेच्या पूर्णतः तज्ञाच्या मते जागतिक महामंदी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्वाची आहे भारत उभरती महासत्ता आहे ,तिचे महत्व कमी करून, तिला जागतिक व्यासपीठावरून डावलून ,जगाचे घोडे पुढे चालू शकणार नाही याची जाणीव जागतिक नेत्यांना झाल्याचे भारताला आमंत्रण देण्यावरून दिसून येत आहे हे नक्की अजिंक्य तरटे
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून कारवाईची नोटीस धाडण्यात आले आहे. ईमेलवरून नोटीस पाठवल्याचे बोलले जात आहे. 16 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. दरम्यान, […]
मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात नाटकीय घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता एकनाथ शिंदे नेमका पुढे काय निर्णय घेणार? […]
मुंबई आग्रा महामार्गावर दोन वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हे फाट्यावर लक्झरी व अल्टोकारची जोरदार धडक झाली. या अपघातात लहांगेवाडी येथील पती पत्नी गंभीर झाल्याची घटना घडली. , मुंबईकडून नाशिककडे जाणारी लक्झरी क्रमांक एम एच ९ सी वी ३६४५ या लक्झरीने वाडीवऱ्हे गावाकडे […]
सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची […]
अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे, हे यापूर्वी आपल्याला कळलेच आहे. आता यातील एक-एक पुष्प आपल्या समोर येत असून प्रेमगीत आणि रॅप साँगनंतर आता ‘मेल्याहून मेल्यागात’ हे सिद्धार्थ जाधववर चित्रीत गाणे […]