भारत जोडो अभियान उपक्रम : उर्दू भाषा परिचय वर्ग समारोप
नासिक : राष्ट्र सेवा दलाच्या आंतरभारती विभागाने विविध भाषांचा परिचय म्हणून उपक्रम सुरू केला आहे. पंचवीस दिवस हा परिचय वर्ग संपन्न झाला.
त्याचाच एक भाग म्हणून एक जाने. 2021 रोजी उर्दू भाषा परिचयाचे वर्ग होलीक्रॅास चर्च नाशिक येथील मंचम हॉलमध्ये
(मंदिर चर्च मस्जिद सभागृह)
उर्दू तज्ञ श्रीयुत व्हि. टी. जाधव सर ह्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. ह्यात उर्दू भाषा ओळख वर्गात सरांनी वर्ण, लिपी, अक्षर ओळख नि वाचन ह्यांचा होमवर्क सहीत विद्यार्थ्यांचा सराव घेतला.
त्या आधी उर्दू भाषेचा उगम विकास ह्याचा इतिहास सांगितला. आतापर्यंत उर्दू भाषा ही इस्लामी असेच आम्ही धरत चाललो होतो. मात्र ही पूर्णपणे
हिंदू स्थानी भाषा असून ती लष्करी छावणीत बोलली जाणारी एक भाषा आहे हे समजल्यावर सारा वर्ग कुतुहलाने अचंबित झाला. आणि उर्दू शाळा म्हणजे
मुस्लिमबहूल मोहल्यातच चालतात हे जरी खरे असले तरी
भारतमातेच्या अनेक भाषा अपत्यांतील हे एक अपत्य आहे. तरीही त्याकडे बऱ्याचदा आम्ही
अज्ञानाने दुर्लक्ष केल्याबद्दल पश्चाताप होऊन अपराधी वाटू लागले.
जगाला प्रेम अर्पण करण्यास निघालेली एकाच भारत देशाची लेकरे आम्ही. आम्ही असे का वागावे?
देशातील वातावरण पाहून त्यावेळी पूज्य सानेगुरूजींनी ही गरज ओळखली होती. आणि त्याच्यातूनच आंतरभारतीची निर्मीती झाली होती. विविध भाषेच्या आत्मियेतून भारत जोडो ही संकल्पना साकारली गेली.
अखिल भारतीय सांप्रत राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आदरणीय भाषातज्ञ आणि सैनिक डाॅ. गणेश देवी हे ह्या अशा उपक्रमाला प्रोत्साहित करीत आहेत. जी आज आपल्या “दुभंगल्या देशाला” कधी नव्हे ती गरज
भासू लागली आहे.
उर्दू वर्गात भाषा ओळख होत असताना सेवादलाचे सैनिक म्हणून जाधवसर आम्हावर
एकात्मतेचे संस्कारही करीत
होते.
पंचवीस दिवसाच्या ह्या अभिजात
उपक्रमानंतर. तीन मार्च रोजी वर्गाचा सांगता समारंभ ह्याच
समतेच्या मूल्यांसाठी विद्यार्थ्यांनी घडवून आणला. जणू सर्व धर्मीय धर्म परिषदच भरवली. आणि सर्व गुरूजनांना सन्मानित केले. ह्या छोटेखानी कार्यक्रमासाठी नाशकातील उर्दू तज्ञ शिक्षक आदरणीय जमीर पठाण सर
आणि इन्कीलाबचे उर्दू पत्रकार लियाकत पठाण सर प्रमुख
पाहुणे म्हणून आत्मयतीने आवर्जून उपस्थित होते.
राष्ट्र सेवा दलातर्फे राष्ट्रीय सचिव मा. नितीन मते आणि मिस्त्री सर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जमीर सर होते. व्ही. टी. जाधव सरांनी प्रास्ताविक
केले.
सुत्रसंचालनात विध्यार्थी भूमिकेत असूनही किरण मोहिते सरांनी आपल्या लाघवी, रसाळ,
उर्दू शायरीयुक्त अस्खलित हिंदीने आपल्या निवेदनातून रंग
भरला. त्याला पाहुण्यांनी मनापासून दाद देऊन त्यांच्या उपजत नजागतेचे कौतुक केले.
ह्यावेळी विद्यार्थ्यांतर्फे अनुक्रमे
इनेज फर्नाडीस, वंदना मते,
वेन्सी डिमेलो ह्यांनी अनुभव कथन करून ह्या स्तुत्य उपक्रमाचे आभार मानले.
जमीर पठाण सरांनी ह्या भाषा चळवळीचे मनस्वी स्वागत केले. आणि “भाषा ही माणसं जोडण्याचे कार्य कसे करते” . ह्याचा आवर्जून उल्लेख केला. आणि दिल्ली उर्दू भाषा केंद्रातर्फे नाशकात सुरू असलेल्या डिप्लोमा कोर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यात वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग दिला.
टिळक वाचनालयाचे संचालक वेन्सी डिमेलो ह्यांनी आवारात
विविध अभिजात उपक्रमाद्वारे
माणसं आणि देश जोडण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात सांगून
सर्व जाती धर्माच्या लोकांनी मानवतेचा धर्म घेऊन आवारात यावे. सत्य सुंदर मंगलाची आस धरावी. मानवाने मानवाशी मानवा सम वागणे. ही प्रार्थना म्हणत यावे. एवढीच प्रांजळ इच्छा प्रगट केली. त्याचे स्वागतच होईल असे आमंत्रण वजा आश्वासनही दिले.
वंदनाताईने आभार मानले.
श्रावस्ती आझाद आणि छोटी
जाधव सरांची नात आनंदी हिने
मानवतेची समयोचित गीते गाऊन कार्यक्रमात वातावरण निर्मिती केली. विद्यार्थी, त्यांचे व कुटुंबीय तसेच राष्ट्र सेवा दल सैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.