ताज्या बातम्या

मोदी एवढे शूर आहेत तर कुलभूषण जाधवला का सोडवले नाही?- छगन भुजबळ

Views: 658
0 0
Read Time:1 Minute, 16 Second

Loading

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरुन पाकिस्तानने भारतीय पायलट अभिनंदनला सोडले असे म्हणता, मग दोन वर्ष झाली कुलभूषण जाधवला का सोडवू शकले नाही?. असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा झाला त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हजार पाकिस्तानी सैनिक परत केले. कोणीही सैन्यांचं राजकारण केलं नाही. मात्र मोदींनी ते केलं, असंही ते त्यावेळी म्हणाले.

दरम्यान, मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *