नाशिक:नाशिक स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली शहरातील अनेक प्रकल्प रखडविले तर काही पाळविण्याचा घाट घातला जात असल्याची टीका समीर भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यानी आज नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर व नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व विभागाच्या बूथ कमिट्यांच्या बैठका पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार डॉ अपूर्व हिरे, जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,नानासाहेब महाले, नगरसेवक गजानन शेलार,माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा,सुषमा पगारे, समिना मेमन, शिवाजी सहाणे, मनोहर कोरडे,अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे,बाळासाहेब कर्डक,कविताताई कर्डक,समाधान जाधव, रामू जाधव, संजय खैरनार, योगेश निसाळ, वैशाली दाणी,बाळासाहेब मते, सुरेखा निमसे,वंदना चाळीसगावकर, मनोहर बोराडे,आसिफ जावरीकर, किशोर शिरसाठ, कुणाल बोरसे, मूवेज शेख, बाबा शरीफ, इम्रान पठाण, चिन्मय गाढे,जीवन रायते, मकरंद सोमवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरात आघाडी सरकारच्या काळात विविध विकासकामे केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली मात्र अनेक स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप सरकारने अनेक प्रकल्प राखडविले आणि काही महत्वाचे प्रकल्प नाशिकमधून पाळविण्यात येत आहे. एकीकडे त्यांनी आम्ही नाशिक दत्तक घेऊन नाशिकला स्मार्ट सिटी करू आशा घोषणा केल्या मात्र त्यांनाच स्मार्ट सिटीचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली.सरकारने अनेक स्वप्न दाखविले मात्र जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युती सरकारला पायउतार करण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, प्रत्येक बूथ मध्ये असणारा कार्यकर्ता आणि त्याचे सहकारी यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न एनसीपी कनेक्ट या अॅपच्या माध्यमातून सोडविले जाणार असून पक्षाच्या पुढच्या वाटचाली संदर्भातील ध्येय धोरणे पोहचविता येणार असून यातून प्रत्येक घरापर्यंत पोहचून यातून पक्षबांधणी होणार आहे.तसेच अनेक सामाजिक प्रश्न देखील मार्गी लावले जाणार आहे.आगामी निवडणुकीच्या माध्यमातून बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख आणि प्रभाग प्रमुखांची जबाबदारी महत्वाची असणार आहे.या बूथ कमिट्याच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक ते महानगरपालिकेच्या निवडणुकी पर्यंत पक्षाची बांधणी होणार आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे
तसेच दि.१६ डिसेंबर रोजी नाशिक शहरातील सिडको येथे होणाऱ्या निर्धार परिवर्तन यात्रेस शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार जयवंतराव जाधव,शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.