[et_pb_section bb_built=”1″][et_pb_row _builder_version=”3.9″ custom_padding=”2%|2%|2%|2%” border_width_all=”1px” border_color_all=”#cccccc”][et_pb_column type=”4_4″][et_pb_text _builder_version=”3.9″]
नवी दिल्ली: काँग्रेसनं देशाच्या विकासासाठी काम केलं मात्र नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्सचा वापर करुन देशाला उद्ध्वस्त केलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
नरेंद्र मोदी बिनकामाचे आहेत, ते कोणाचंही ऐकत नाहीत, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीमुळं देशभरातील एक कोटी लोकांना बेरोजगार व्हावं लागलं, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.
दरम्यान, राफेल डीलवरुन काँग्रेस देशात संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केला आहे.
[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]