[et_pb_section bb_built=”1″][et_pb_row _builder_version=”3.9″ custom_padding=”2%|2%|2%|2%” border_width_all=”1px” border_color_all=”#cccccc”][et_pb_column type=”4_4″][et_pb_text _builder_version=”3.9″]
मनुवादी सरकारला दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिनाचा विसर
– छगन भुजबळ यांचा राज्य सरकारवर घणाघात
मुंबई : राज्य सरकारने छापलेल्या दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख न केल्याने सरकार मनुवादी वृत्तीचे असल्याचे सिद्ध झाले असून सरकारच्या या मनोवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध करत असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
छगन भुजबळ यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्याच्या महतीने सांगितले जाते.मात्र युतीसरकार कडून काढण्यात आलेल्या शासकीय दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नाही ही अत्यंत गंभीर बाब असून मनुवादी सरकारकडून महामानवांचा अवमान केला जात आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून वारंवार चुका होत असतांना सबधितांवर कुठलीही कारवाई होत नाही. युती सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे.
या देशात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता प्रस्थापित होण्यासाठी आपले आयुष्य वेचले. देशातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आणि समाजात महत्वाचे स्थान मिळवून दिले.अशा महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिनाचा सरकारला विसर पडावा ही दुर्दैवी घटना आहे. सरकारकडून महामानवांचा होत असलेल्या अवमानामुळे सरकार मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते आहे की काय सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या मनुवादी सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे सांगून राज्य सरकारने माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संबधितांवर कारवाई करावी तसेच सदर चूक दुरुस्त करून पुन्हा नव्याने दिनदर्शिका प्रकाशित करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]