- हृदयरोगाचे वाढते प्रमाण याला बदलती जीवन पद्धती व कामाचा ताण तणावं कमी ही कारणे
- डॉ. गिरीश बच्छाव यांचे नाशिकला मराठा सेवा संघाच्या बैठकीत मार्गदर्शन.
नाशिक (प्रतिनिधी): धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे तणावाचे प्रमाण वाढत आहे.स्वतःचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. फास्टफूड व पिझा यांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे.तरुणांमध्ये तंबाखू, गुटखा, मद्यपान यामुळे रक्तवाहिनीत रक्त घट्ट होते यामुळे हृदयाला रक्त पोहोचत नाही यामुळे हृदयविकार होतो याचे प्रमाण वाढत चालले असून वेळीच काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा प्रसार होईल असे प्रतिपादन डॉ.गिरीश बच्छाव यांनी केले.
![धकाधकीच्या जीवनात स्वतःचे आरोग्य सांभाळा: डॉ. गिरीश बच्छाव 2 IMG 20240620 WA0000](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240620-WA0000.jpg?resize=640%2C360&ssl=1)
नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
नाशिकच्या मविप्रच्या छत्रपती शाहू महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये मराठा सेवा संघाची (दि १९ रोजी ) उद्योजक मार्गदर्शन सभा व मार्गदर्शन कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ.आत्माराम कुंभाडे, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या राजश्री शाहू इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रशांत पाटील, वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राम खुर्दळ,कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास साबळे,उपाध्यक्ष दीपक पाटील, उद्योजक अजय क्षीरसागर, मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष नाशिक विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले, कार्यकारिणी प्रमुख जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे,कार्याध्यक्ष दीपक भदाणे, सरचिटणीस उल्हास बोरसे, सहसचिव मनोज आमले, संघटक डॉ.संदीप बोरसे,सहसंघटक क्रांति बेडसे, शहराध्यक्ष अमोल पाटील, सातपूर विभाग प्रमुख सुधीर सोनवणे उपस्थित होते.रजिस्ट्रेशन अटेंडन्स कमिटीचे इंजि.चेतन पवार,सागर तारडे, इंजि.राहुल देसले, गेस्ट आणि स्पीकर कमिटी रामनाथ जगताप, सि.ए.उल्हास बोरसे, बाळासाहेब आंब्रे फायनान्स कमिटी सुनील घुले, आदित्य कडलग बिझनेस डेव्हलपमेंट आणि रेफरन्स कमिटी मनोज आमले, राजेश साळवे, वन टू वन एंटरटेनमेंट कमिटीचे विकास देशमुख, दत्ता भालेराव,अंबादास घोटेकर इव्हेंट ऑर्गनायझेशन कमिटी संदीप सोमवंशी, सोशल आणि प्रिंट मीडिया पब्लिकेशन कमिटी, दीपक भदाणे, अरविंद पवार,मनोहर पाटील यासह तक्रार निवारण आणि मार्गदर्शक कमिटीचे रामनाथ जगताप, उल्हास बोरसे,प्रशांत पाटील,उदय ठाकरे, पब्लिक रिलेशन कमिटी इंजि.नितीन पाटील, महिला उद्योजक डेव्हलपमेंट कमिटीचे डॉ.सारिका महाले उपस्थित होते. यावेळी डॉ बच्छाव यांनी सांगितले की, हृदयविकार कुठल्याही वयोगटात होऊ शकतो, रक्त वाहिनीतील अडथळे हृदय विकार होण्यास कारणीभूत असतो.
हृदय विकाराने जितका भाग काम करीत नसला त्यामुळे पेशंटची कार्यक्षमता कमी होते. जास्त दम लागणे हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे.छातीचा भाग दडपण आल्यासारखं वाटणं ही लक्षण आहे. रक्त पुरवठा हृदयाला मिळायला कमी होणे यामुळे हृदयविकार होतो. ऍसिडिटी झाली ती अंगावर काढणे त्यामुळं ही भविष्यात अडचणी येतात, हृदयावर दडपण छातीवर दगड ठेवण्यासारखे वाटणे हा ही हृदय विकाराचे लक्षण वाढत आहे. डायबिटीक्स थकवा यावेळी हृदय तपासणी करुण घ्या बदलती जीवन पद्धती हेच कारण,श्रम कमी झाल.शारीरिक व्यायाम व श्रम कमी झाल्याने हृदय विकार प्रमाण वाढत आहे.