सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५४० वा दिवस
श्रेष्ठतम वीरवृत्ती म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांची निःस्वार्थपणे सेवा करणे, नेहमी संयमी वृत्ती बाळगणे. कोणत्याही परिस्थितीत क्रोधीत न होता, संयमी जीवन जगणे होय. वीरवृत्ती म्हणजे निःशेष आत्मसमर्पण ! आपल्या क्रोधावर विजय मिळवणे हे सर्वात महान वीराचे आभूषण आहे. आज्ञा होताच पुढे सरसावून इष्ट कार्यासाठी स्वतःच्या प्राणार्पणासाठी सदैव सिद्ध असणारा नेताच इतरांना जीवन समर्पण करण्याची आज्ञा देऊ शकतो. प्रथमतः स्वतः आत्मसमर्पण केले पाहिजे. तदनंतरच इतरांना उपदेश करण्याचा अधिकार आपणास प्राप्त होतो. जो अंतःकरणपूर्वक सर्वांचा होऊ शकतो, तोच खरा वीर नेता होय.
*…स्वामी विवेकानंद*
*● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●*
*★ भारतीय सौर २२ वैशाख शके १९४६*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ सोमवार दि. १३ मे २०२४
★ १६४८ दिल्लीच्या लाल किल्ल्याचे काम पूर्ण झाले.
★ २००१ सुप्रसिध्द इंग्लिश साहित्यिक, गाईड, मालगुडीका आदमखोरचे लेखक पद्मविभूषण रासीपूरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी ऊर्फ आर. के. नारायण यांचा स्मृतीदिन.
★ २०१६ संत निरंकारी हरदेव सिंहजी महाराज यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*