नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नाशिककरांना वारंवार घरगुती विज बंद झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याचा एकतर उकडा वाढल्याने सूर्य जणूकाही आगच ओकत आहे, त्यामुळे शहरातील तापमान वाढत आहे. त्यात आज काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यात ब-याच ठिकाणी झाडाझुडपांचे नुकसान झाले. यावेळी दिवसाही लाईटीची ये-जा चालु होती. यामुळे नागरिक हैरान झाले आहे. वेळेत विज तारांना धोका दर्शवणा-या झाडांची हे छाटणी झाली असती तर विजधारक ग्राहकांना आंधारात राहण्याची वेळ आलीच नसती आशी चर्चा नागरिकांत होत आहे. तर वेळोवळी तासंतास लाईट नसल्याने उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मी महावितरण कंपनीचा ग्राहक असून आज पाऊसाने हजेरीलावताच अंबड परिसरातील रहिवाशी विभागातील लाईट वेळोवेळी बंद झाली. बरेच वेळ लाईट बंद झाल्याने उष्णतेच्या त्रासामुळे मला आमच्या घरातील लहान बाळाला खुप त्रास झाला. महावितरण कंपनी आम्हाला ग्राहक म्हणून आमच्या त्रासाची भरपाई देणार का?
दिनेश पाटील, नागरिक