राजाभाऊ वाजे हे सर्वसमावेशक नेतृत्व, जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याच्या केला दावा!
घोटी (प्रतिनिधी): ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती सोबत आहे जनतेने हातात घेतली असून हा जमलेला जनसमुदाय विजयाची नांदी दर्शवत आहे. राजाभाऊ वाजे हे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी केले. घोटी येथे जैन भवन येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर होते. ते पुढे म्हणाले की, पक्षातून कोण गेले कोण राहिले यावर काही फरक पडत आहे. पक्षात जो कार्यकर्ता टिकून आहे तो हाडाचा कार्यकर्ता असून त्यामुळे ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारी अशी आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपासणाऱ्या गद्दारांना धडा सर्व सामान्य जनता धडा शिकवल्यशिवाय राहणार नाही. सर्वांनी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन मामा माळी, रमेश गावित, उभाठा तालुकाध्यक्ष राजाभाऊ नाठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, मविप्र संचालक संदीप गुळवे, कुलदीप चौधरी, काशिनाथ कोरडे, उमेश खातळे, भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, देविदास आडोळे, कचरू डुकरे, शिवाजी शिरसाठ, पांडुमामा शिंदे, अर्जुन भोर, माजी सभापती सोमनाथ जोशी, नंदलाल भागडे, विठ्ठल लंगडे, उत्तम भोसले, संपत वाजे, संदीप जाधव, अंबादास धोंगडे, रमेश धांडे, कचरू बागुल आदी पदाधिकारी व महाविकास आघाडी व इंडिया आघाडी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.