नाशिक (प्रतिनिधी): राज्यभरात सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० ते ४४ अंशांदरम्यान पोहचला आहे. त्या तुलनेत मागील चार-पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील तापमानाचा पारा किमान आहे. किमान तापमानाचा पाराही स्थिर असल्याने दिवसा उकाडा आणि पहाटेच्या अल्प गारवा, असे वातावरण शहर व जिल्ह्यात आहे.
पुढील चार-पाच दिवस जिल्ह्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २६ अंशांदरम्यान राहिल. तसेच वाºयाचा वेग १४ ते १८ किलोमीटर प्रतितास या दरम्यान राहण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्राने वर्तविली आहे.
राज्यभरात उष्णतेची लाट असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यंदा तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पिकांना देखील फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले. येत्या चार ते पाच दिवसात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत जवळपास ३८ ते ३९ अंश सेल्सिअस इतके तापमान राहणार असल्याचा अंदाज विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तविला आहे.