सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५३१ वा दिवस
मुलांनी अगदी किशोर अवस्थेपासूनच उज्वल, प्रेरणादायी व चारित्र्यसंपन्न व्यक्तींच्या सानिध्यात राहिले पाहिजे. सर्वोच्च शिक्षणाचे जिवंत उदाहरण नेहमी मुलांच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. खोटे बोलणे हे पाप आहे, असे नुसते वाचून उपयोगाचे नाही, तर त्यांना पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करायला शिकवले पाहिजे. त्यांच्याठायी श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतील अशा कृती केल्या पाहिजे. ज्यांच्या ह्रदयात श्रद्धा आणि विश्वास नाही तो खोटे बोलणारच. आपल्या देशात नेहमी त्यागी सत्पुरुषच ज्ञानदानाचे कार्य करीत आले आहेत. ज्ञानदानाचे कार्य जोपर्यंत त्यागी लोकांकडून होत होते, तोपर्यंतच भारताचे भविष्य उज्वल व उन्नत होते.
…स्वामी विवेकानंद
● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●
★ भारतीय सौर १४ वैशाख शके १९४६
★ चैत्र वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५०
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शनिवार दि. ४ मे २०२४
★ वरुथिनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
★ वल्लभाचार्य जयंती
★१९८९ भारतातील ग्रामपंचायत व पंचायत समिती यामध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याची पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
★ १९९५ बाॅम्बे ऐवजी मुंबई शब्द वापरला जावा, असा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
★ कोळसा कामगार दिन…
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक