नाशिक (प्रतिनिधी): गेले दोन दिवसांपासून उन्हाचा चांगलात तडाखा बसत असताना आज सकाळी 5:30वाजता नाशकात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतमालाचे चांगलेच नुकसान होणार आसून भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे? शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आसून एकीकडे शहर भागातील नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळालेला आहे. तसेच लग्नसराई सुरू असल्याने लगीन घरातील मंडळींची चांगलीच धांदल उडाली आहे. दिवसभर तूरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.