मुंबई : राज्यामध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर आता डेंग्यूने राज्यामध्ये थैमान घातला आहे. राज्यामध्ये दर दोन तासाला डेंग्यूने पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
देशभरातील डेंग्यूच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साल २०२३ मध्ये १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत देशात २ लाख ३४ हजार ४२७ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी महाराष्ट्रात १७ हजार ५३१ इतकी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आहे. डेंग्यू रुग्णसंख्येत बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे एकूण १९ हजार ६७२ रुग्ण आढळले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ३३ हजार ७३ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.
४ हजार ३०० रुग्ण मुंबईत
राज्यात एकट्या मुंबईमध्येच ४ हजार ३०० रुग्ण आढळून आलेत. बीएमसी आरोग्य विभगातील सूत्रांकडून याबाबत माहिती मिळालीये. डेंग्यू रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता आरोग्य विभागाने काही सूचना जाहिर केल्यात. डासांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची योग्य ती काळजी घ्वावी.