पुणे : जिल्ह्यामधील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. त्याचे निकाल आज (दि. ६) समोर येत आहेत. बारामती येथे अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली.
काटेवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व १६ जागांसाठी मतदान पार पडले असून, आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘आता सुरुवात झाली आहे, पुढे पाहावं लागेल कसा निकाल लागणार आहे.
निकालानुसार बारामतीमध्ये आमबी बुद्रुक, पवई माळ, भोंडवे वाडी, पानसरे वाडी, महसोबा नगर, गाडी खेल, करंजे, जराडवाडी, कुतवल वाडी, दंडवाडी, मगर वाडी, सिद्धेश्वर निंबोडी, साबळे वाडीत अजित पवार गट विजयी झाला आहे. भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला. नाव मोठं व लक्षण खोटं, अशी परिस्थिती गावात असल्याचे कचरे यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला खा. अमोल कोल्हे यांचे गाव असलेल्या नारायणगाव येथे राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. तिथे ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. हाती आलेल्या निकालानुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत महायुतीने २९१, मविआने १३९, इतरांनी ५९ ग्रामपंचायती जिंकल्या आहे.