सदा चांगली कामे करीत चला; हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अमुक माणसाच्या उद्धाराची आता काही आशा नाही असे कदापी म्हणू नका, कारण वाईट मनुष्य म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे चारित्र्य आणि चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळाबेरीज; आणि अशा जुन्या सवयी नव्या व चांगल्या सवयींनी काबूत आणता येतात, दूर करता येतात. चारित्र्य म्हणजे सवयींची पुनरावृत्ती, आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल, सुधरू शकेल. ब्रह्मचर्यनिष्ठ व्यक्तीच्या मेंदूत विलक्षण सामर्थ्य वास करीत असते आणि तिच्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्ती उत्पन्न होत असते.
*स्वामी विवेकानंद…**●
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर ६ आषाढ शक १९४५*★ आषाढ शुध्द /शुक्ल ९★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ मंगळवार दि. २७ जून २०२३ ★ कांदे नवमी ★ १७०८ मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती धनाजी जाधव यांचा जन्मदिन★ १८३८ सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, लेखक, पत्रकार, ‘आनंदमठ’ कादंबरीत वंदे मातरम राष्ट्रीय गाण रचणारे कवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्मदिन.★ १८८० अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्मदिन★ २००८ भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा स्मृतिदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*