डॉ.नाईकः डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षक,विद्यार्थ्यांशी साधला संवाद
![बाबासाहेबांची एकसंघ,समतेची मशाल पुढे घेऊन जाऊ या 2 WhatsApp Image 2023 04 13 at 7.59.19 PM 1](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-13-at-7.59.19-PM-1.jpeg?resize=640%2C288&ssl=1)
नाशिकः सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक होते.कायदा,अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळवल्या. देशात एकोपा,एकसंघपणा तसेच समता,बंधुता कायम राहावी. यासाठी हा महामानव लढला, ही समता,बंधुतेची मशाल घेऊन राष्ट्रीय एकोप्यासाठी आपल्याला पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन भोसला मिलीटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी केले.
![बाबासाहेबांची एकसंघ,समतेची मशाल पुढे घेऊन जाऊ या 3 WhatsApp Image 2023 04 14 at 7.15.39 PM 1](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-14-at-7.15.39-PM-1.jpeg?resize=640%2C288&ssl=1)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आज संस्थेतील शिक्षक,विद्यार्थ्यांसाठी डॉ.नाईक यांचे व्याख्यान झाले. डॉ. आंबेडकरांचे जीवन म्हणजे नवरत्नच हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय़ होता. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर, नाशिक विभागाचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे,सहकार्यवाह नितीन गर्गे,कोषाध्यक्ष शितल देशपांडे, सदस्य प्रशांत नाईक,नाना वाणी, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक विजयराव साळुंखे उपस्थित होते. डॉ.नाईक यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांचे पैलु सर्वांसमोर मांडले. बाबासाहेब हे नवरत्नांनी भारावलेले व्यक्तीमत्व होते. वडील रामजीबाबांपासून कौटुंबिक सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न त्यांनी केले. जीवनात मानहानीच्या अनेक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले पण न डगमगता त्यांनी तोंड देत पुढे वाटचाल केली. समाजव्यवस्थेने आपल्याला नाकारले आहे त्यामुळे पुढील काळात हा समाज आपल्याला कसा स्विकारेल हा विचार त्यांच्या मनी कायम घोळत राहिला.
![बाबासाहेबांची एकसंघ,समतेची मशाल पुढे घेऊन जाऊ या 4 WhatsApp Image 2023 04 14 at 7.15.39 PM](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-14-at-7.15.39-PM.jpeg?resize=640%2C288&ssl=1)
बुध्दचरित्रामुळे परिवर्तनास सुरवात
डॉ.नाईक म्हणाले, कृष्णाजी केळुस्करांनी दिलेल्या बुध्दचरित्रामुळे हा विचार त्यांच्या मनात रूजला. दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र ते झटत राहिले. सवर्णांच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते प्रयत्नशील होते. हिंदु धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी,यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. आपण शिकलो तरच हा लढा यशस्वी होईल, असे त्यांना वाटे त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन त्यांनी समाजाची प्रगती केली. यावेळी डॉ.नाईक यांनी बॅरिस्टर चंदावारकर यांचे उदाहरण दिले. महात्मा फुले, कबीराचे (दोहे) आण भगवान गौत्म बुध्द यांचा बाबासाहेबांवर कायम प्रभाव राहिला.
निटनेटकेपणा अन् काळाराम मंदीर,चवदार तळे सत्याग्रह