जगातील कोणताही देश मग तो कितीही बलाढ्य असो तो अध्यात्म वगळता केवळ आणि केवळ आधुनिक विज्ञानाच्या पायावर उभा राहू शकणार नाही. जगाचा इतिहासच आपल्याला हे सांगतो की, अशा पायावर जे देश उभे होते ते सर्व आता नष्ट झाले आहेत. प्रथमतः अशा विचारांची भारतात येणारी लाट आपण थोपवून धरली पाहिजे. याकरता धर्माला आधुनिक विज्ञानाच्या आघातांना तोंड देता यावे म्हणून प्रत्येकाला अद्वैताची शिकवण द्या. एवढेच नव्हे तर तुम्हाला इतर देशांनाही सहाय्य करावे लागेल. *स्वामी विवेकानंद…..**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर ५ पौष शक १९४४*★ पौष शुध्द /शुक्ल ५★ शालिवाहन शके १९४४★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२४ ★ मंगळवार दि. २७ डिसेंबर २०२२★ १७९७ उर्दू भाषेतील शायरीचे बादशाह मिर्झा गालिब यांचा जन्मदिन.★ १९११ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात “जण गण मन” हे रवींद्रनाथ टागोर रचित गीत पहिल्यांदा गाण्यात आले.★ १८९८ स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*