आमदार रवी राणा मी बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वत्र गाजत असताना याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
रवी राणा अंगार है बाकी सब भंगार है अशाही घोषणा देण्यात आल्या. तसेच रवी राणा म्हणजे उगवता सूर्यासारखे आहेत बच्चू कडूंनी त्यांच्यावर थंकू नये, बच्चू कडून वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आगामी काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बच्चू कडूंवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष राम भगुरे यांनी सांगितले.