[et_pb_section bb_built=”1″][et_pb_row _builder_version=”3.9″ custom_padding=”2%|2%|2%|2%” border_width_all=”1px” border_color_all=”#cccccc”][et_pb_column type=”4_4″][et_pb_text _builder_version=”3.9″]
नाशिक : शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असल्याने केंद्र सरकारशी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून दिलासा द्यावा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांना घातले आहे.
आज रोजी कांद्याचे भाव कवडीमोल झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात सातत्याने रेल्वे रोको, रास्ता रोको, कांदा फेको यासारखी आंदोलने करण्यात येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या भावना पंतप्रधान तसेच केंद्रीय वाणिज्य व कृषी मंत्र्यांपर्यंत पोहचवून कांद्याच्या भावासाठी प्रयत्न करण्याची विनंती खा. पवार यांना करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, मालेगावचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जिल्हा पदाधिकारी विजय दशपुते आदी उपस्थित होते.
[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]