देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयात हॅलो ऐवजी वंदेमातरम् म्हणा अशी घोषणा ना सुधीर मुनगंटीवार यांनी केली असतांना किमान महाराष्ट्रात तरी जय शिवराय बोला अशी भावना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी व्यक्त केली आहे.
निश्चयाचा महामेरू। बहुतजनांशी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी॥
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरूध्द प्रखर लढा देऊन स्वराज्य निर्माण केले आहे. रयतेचा राजा म्हटले की महाराजांशिवाय दुसरे नाव मुखी येत नाही. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन महाराजांनी हे राज्य निर्माण केले. स्त्रियांचा सन्मान आणि त्यांची रक्षा हे आपले आद्य कर्तव्य महाराज मानत. जातीपातीच्या भिंती तोडून महाराजांनी सर्वांना समान न्याय दिला आहे. धर्माच्या नावाखाली त्यांनी कधीही कुणासोबत पक्षपात केला नाही. अशा महाराजांचे अनंत काळ आपल्याला स्मरण रहावे म्हणून हॅलो या ऐवजी किमान महाराष्ट्रात तरी जय शिवराय बोलू या अशी भावना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी व्यक्त केली आहे.