नाशिक – तंत्रज्ञान क्षेत्रात के के वाघ अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय हे महाराष्ट्रात नावारुपास आले आहे. विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने महाविद्यालय तत्परतेने कार्य करत असते. गेल्या तीन वर्षांपासून केमिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची शाखा निहाय (कोर) कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू पेंटस, जिंदाल, अदानी, टोयो इंजिनीरिंग, आरती इंडस्ट्री, कोणार्क ग्लोबल, आर्ट रबर, सिप्ला, लुपिन, एस.व्ही.आय कार्बन,बिकोन आदीं कंपनीं मध्ये मोठ्या प्रमाणात निवड झालेली आहे.
प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला केमिकल विभागाच्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी बद्दल माहिती देत, सी.सी. प्लस – प्लस
व अन्य प्रोग्रामिंगचे कौशल्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. याचा विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी होत असतो. त्यात इन्फोसिस, टी सी एस, विप्रो, कॅपजेमिनी ह्या नामांकित कंपनीचा समावेश आहे.
के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान शिक्षणा सोबत डॉ ए पी जे अब्दुल कलाम सेंटर मार्फत कौशल्य वाढीसाठी प्रोग्रामिंग स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, अॅप्टिट्यूड टेस्ट आदींचे प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे विद्यार्थी स्वतःचे करिअर घडवण्यासाठी सक्षम होतात अशी माहिती प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी दिली.
सन १९९९ पासून महाविद्यालयात केमिकल अभियांत्रिकी शाखेची स्थापना झाली. आत्ता पर्यंत सुमारे १००० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन देश-विदेशात विविध पदावर कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांशी विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय थाटले आहेत. अशी माहिती केमिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ व्ही एस माने यांनी दिली.
सरासरी ६५% रासायनिक अभियांत्रिकीच्याविद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाच लाखांचे तर सरासरी तीन लाखांचे पॅकेज प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु असतानाच विद्यार्थ्यांना परदेशांत असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधीं बद्दल जाणीव करून दिली जाते. १५ – २० % विद्यार्थी देश-देशातील उच्च शिक्षण जसे एम.टेक,एमबीएआणि एम.एस करण्यासाठी फ्रान्स, युके, युएसए, जर्मनी येथे गेले असून त्याच बरोबर
उद्योजकता विकास सेल तर्फे दिल्या जाणारे प्रशिक्षण जसे विविध कार्यशाळा, मोटिवेशनल टॉक, सक्सेस स्टोरीज ऐकून प्रेरित होऊन ५ – १० % विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेऊन ते यशस्वी उद्योजक झालेले आहेत. अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डाॅ. पी के शहाबादकर यांनी दिली.
या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री समीर वाघ, विश्वस्त मा श्री चांगदेवराव होळकर, मा. श्री अशोक भाई मर्चंट, सचिव मा. प्रा के एस बंदी, विभागप्रमुख डॉ एस एस साने, डॉ पी डी भामरे, प्रा एम मुरुगकर, डॉ पी जे पवार यांनी सर्व कंपन्यांचे आभार मानले आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.