औरंगाबाद – राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील यांनी शेरोशायरी अंदाजात राज ठाकरे यांच्यावर टिका केली.
सियासात की दुकानो मे रोशनी के लिय मुल्क मेरा जलता, अशा आणि सियासत नफरतो के जखमो को भरणे नही देती, जब भी भरणे आता है जख्म वहा मख्खी बैठ जाती है, अशा अंदाजात त्यांनी टिका केली. तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक तेढ वाढवणे सुरू आहे. भोंगे काढण्याची मुदत एक दिवसाने वाढली. म्हणजे ते म्हणतात कार्यकर्त्यांनो तुम्ही करा आणि मी अयोध्येला जातो, म्हणजे केसेस कार्यकर्त्यांवर. ते मरणार हे फिरणार, अशी टीका जलील यांनी केली.
भारतीय जनता पार्टी तुम्हाला रिमोट कंट्रोलद्वारे चालवत आहे. भाजप सरकारने त्यांच्या काळात काहीच केले नाही. खिलजीची आठवण आता कशाला. जी चूक झाली ते झाली, आज का काढायची. कोर्टाचे आदेश आम्ही पाळू कारण तो कोर्टाचा आदेश आहे. तुम्ही डुप्लिकेट माणूस आहात, आम्ही नाही. सभा करून निर्णय होत असेल तर यापेक्षा दुप्पट सभा आम्ही घेऊ. मी ही बोलू शकतो, जीभ आम्हालाही आहे, आता सरकारने निर्णय घ्यावा, असा इशारा जलील यांनी दिला.